05/09/2026
कपाशीतील आकस्मिक मर रोग :
लक्षणेः दिवसाचे तापमान ३८० सें. पेक्षा जास्त दीर्घकाळ टिकून राहिल्यास तसेच पाण्याचा ताण बसल्यास आणि पावसाळ्यामध्ये शेतात पाणी साचून राहिल्यास कपाशीच्या शरीरक्रियांवर अनिष्ट परिणाम होतो. पाण्याचा ताण बसल्यामुळे अन्नद्रव्य शोषून घेणाऱ्या जलवाहिन्या फुगीर बनतात आणि नलिका बंद होतात. झाडाच्या पाने, फुले व बोंडे यांना अन्नद्रव्य पुरवठा न झाल्यामुळे पानांचा तजेला नाहीसा होतो आणि पाने पिवळी पडतात. पाने, फुले व बोंडे यांची गळ होते आणि झाड मरते.
उपायः पिकामध्ये पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी आणि साचलेले पाणी लगेच काढून द्यावे. विकृतीग्रस्त झाडांना लक्षणे दिसू लागताच १.५ किलो युरिया १.५ किलो म्युरेट ऑफ पोटॅश १०० लिटर पाण्यात मिसळून १५० ते २०० मि.लि. द्यावे. त्यानंतर ८-१० दिवसांनी २ किलो डिएपी १०० लिटर पाण्यात मिसळून हे द्रावण १५० ते २०० मि.लि. झाडाच्या बुंध्याजवळ ओतावे व लगेच पाणी द्यावे.
#कपाशी #शेतकरी #कृषी #शेती